Saturday, July 31, 2010

म्हणजे सगळं संपलं असं का?


PART I

आई-बाबांनी शाळेच्या गेटपरियंत सोडून...
पाठमोऱ्या तुझ्याकडे बघून,
छोटसं एक स्वप्न पाहिलं.
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या शाळेच्या फी-साठी
बाबांनी अगाचं पाणी-पाणी केलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानेच मोडलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या नको त्या हट्टा-पायी
स्वतःचं सुद्धा गहाण टाकलं ...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझा सुखी संसार जोडून
त्यांनी मात्र ,
त्यांच्याच घरातून पाऊल बाहेर काढलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

PART II

नाही, आता आयुष्य सुरु झालं...
गेलेल्या त्या पाउलाणा परत आणण्यासाठी ...
गहाण ठेवलेलं नाव परत मिळविण्यासाठी...

जिद्द असू दे तुझ्या जीवनात
मोडलेलं बाबाचं आयुष्य ,
पुन्हा नव्यानं जोडण्यासाठी...

मोठं तर जीवनात तुला खूप व्हायचंय
पण लक्षात असू दे
बाबांच्या अगांच पडलेलं पाणी,
आणायला तुला खूप दूर जायचंय...

आई-बाबासारखे देव घरात असताना,
कुठलं रे बाहेर मंदिर तू शोधतोय...
आदरपूर्व त्यांना नमस्कार कर,
बघ,
तुझं स्वप्न कसं तुझ्या पायात येऊन पडतं.....

- मयुर वाकचौरे